Ramachandra sabale – यंदा पाऊस ऑक्टोंबर महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता.
Ramachandra sabale : राज्यातील हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार यावर्षीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता आहे.. तरी यंदा शेती पिकाच्या काढणी काळात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका नाकारता येत नसल्याने शेतकऱ्यांनी वेळेवरच आपल्या पिकाची हार्वेस्टिंग करावी.
1) रामचंद्र साबळे : ला निनाचा प्रभाव वाढतोय…?
रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार.. प्रशांत महासागराच्या विषुववृतीय भागातील पेरू 15°c इक्वेडोरजवळ (17℃) समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान कमी झाल्याने असल्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव वाढत आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील काळात चांगला आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.
2) पावसाच्या स्थितीवर हवामान बदलाचा परिणाम..?
रामचंद्र साबळे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा एक जून पासून आतापर्यंत विचार केला तर.. काही तालुक्यांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे.. तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामानाच्या बदलत्या काळामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी काही ठिकाणी ढगफुटी तर काही ठिकाणी कमी पाऊस झाला आहे. याचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे असं साबळे म्हणाले.